भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना हा केवळ खेळ नसून भावनांचे युद्ध मानले जाते. दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये अनेक तणाव निर्माण झाले आहेत, परंतु क्रिकेटच्या इतिहासात असे काही खेळाडू आहेत ज्यांनी दोन्ही देशांच्या संघाचा भाग बनून अनोखे विक्रम केले आहेत. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या त्या तीन क्रिकेटपटूंबद्दल जाणून घेऊया.
1- अमीर इलाही
अमीर इलाही हा दोन्ही देशांच्या कसोटी संघांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मोजक्या खेळाडूंपैकी एक आहे. त्याने 1947 मध्ये भारताकडून कसोटी पदार्पण केले. त्यानंतर तो पाकिस्तानला गेला आणि तिथल्या राष्ट्रीय संघाकडूनही खेळला. अमीर इलाही यांनी एकूण 6 कसोटी सामने खेळले, त्यापैकी एक भारतासाठी आणि उर्वरित पाकिस्तानसाठी होता. त्याच्या नावावर प्रथम श्रेणी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 520 विकेट्स आहेत.
2-अब्दुल हफीज कारदार
अब्दुल हफीज कारदार हा पाकिस्तान क्रिकेटमधील सुरुवातीचा सर्वात मोठा चेहरा मानला जातो. पाकिस्तान क्रिकेटमधील त्यांच्या योगदानामुळे त्यांना “पाकिस्तान क्रिकेटचे जनक” म्हटले जाते. कारदार यांनी प्रथम भारतासाठी 3 कसोटी सामने खेळले, परंतु नंतर ते पाकिस्तान संघाचा भाग बनले आणि 1952 मध्ये त्यांनी संघाचे कर्णधारपदही स्वीकारले. त्यांनी पाकिस्तानसाठी 23 कसोटी सामने खेळले. कारदारने आपल्या कसोटी कारकिर्दीत 26 सामन्यांत 927 धावा केल्या ज्यात 5 अर्धशतकांचा समावेश आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ६८३२ धावा आहेत.
3- गुल मोहम्मद
या विशेष यादीत गुल मोहम्मदच्या नावाचाही समावेश आहे. त्याने 1946 ते 1955 दरम्यान भारतासाठी 8 कसोटी सामने खेळले. त्यानंतर 1956 मध्ये पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कराची येथे कसोटी सामना खेळून इतिहास रचला. गुल मोहम्मदने आपल्या कसोटी कारकिर्दीत 9 सामन्यात 205 धावा केल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 118 सामन्यांमध्ये 5614 धावा केल्या. या तिन्ही खेळाडूंची कहाणी क्रिकेटच्या इतिहासातील एक असा अध्याय आहे, जो कदाचित पुन्हा कधीही दिसणार नाही.










