प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 349 धावा केल्या आहेत. ऋतुराज गायकवाड, टिळक वर्मा आणि प्रभसिमरन सिंग यांच्या अर्धशतकी खेळीमुळे भारत अ संघाला मोठी धावसंख्या गाठता आली. सुर्यांश शेडगेने पुन्हा एकदा दमदार फलंदाजी करत 40 धावांचे योगदान दिले. पावसामुळे सामन्यातील प्रत्येक डावातील षटकांची संख्या ४९ करण्यात आली आहे.
भारतीय डावाची सुरुवात प्रभसिमरन सिंग आणि वैभव सूर्यवंशी यांनी केली. या दोघांनी संघाला झंझावाती सुरुवात करून दिली आणि अवघ्या 7 षटकात संघाची धावसंख्या 70 च्या पुढे गेली. 22 चेंडूत 44 धावा करून वैभव बाद झाला आणि सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे वैभवने आपल्या डावात 9 चौकार मारले पण एकही षटकार मारला नाही.
गायकवाड-टिळक-प्रभ सिमरन चमकले
भारत अ संघाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया प्रभासिमरन सिंगने रचला, ज्याने 69 चेंडूत 84 धावांची खेळी केली आणि या डावात 14 चौकार लगावले. प्रियांश आर्यला सलग दुसऱ्या सामन्यात मोठी धावसंख्या करता आली नाही. मात्र गेल्या सामन्यातील शतकवीर ऋतुराज गायकवाडने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवत 66 धावांची अर्धशतकी खेळी खेळली. दुसरीकडे कर्णधार टिळक वर्माने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावत 66 धावा केल्या. दोघांमध्ये 78 धावांची भागीदारी झाली.
अफगाणिस्तानच्या वतीने अब्दुल्ला अहमदझाईने धुव्वा उडवत ५ बळी घेतले. फरमानुल्ला सैफी चांगलाच महागात पडला, पण 3 फलंदाज बाद करण्यात यशस्वी ठरला. कर्णधार इम्रान मीर आणि खलील गुरबाज यांनी भारतीय फलंदाजांना हात उघडण्याची संधी दिली नाही, पण इतर गोलंदाजी मात्र चांगलीच महागडी ठरली.
तिरंगी मालिकेतील हा दुसरा सामना असून अफगाणिस्तान पहिला सामना खेळत आहे. भारत अ संघाने मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रीलंका अ संघाचा पराभव केला.
हे देखील वाचा:










