शुभमन गिलने डिसेंबर २०२५ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताकडून शेवटचा टी-२० सामना खेळला होता. २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठीही त्याची निवड झाली नव्हती. आता IPL 2026 च्या फायनलपूर्वी पत्रकार परिषदेत गिलने भारतासाठी तिन्ही फॉरमॅट खेळण्याबाबत मोठे विधान केले. गिल म्हणतो की, त्याला कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा प्रत्येक फॉरमॅटमध्ये चांगला फलंदाज व्हायचे आहे.

गिलला टी-20 मध्ये पुनरागमन करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर प्रतिक्रिया देताना गिल म्हणाला, “जर माझी टी-20 संघात निवड झाली तर मला आनंद होईल. मला माझ्या खेळावर काम करायचे आहे. मला टी-20, एकदिवसीय आणि कसोटी फॉरमॅटमध्ये सातत्याने चांगला फलंदाज बनायचे आहे.”

क्रिकेटमध्ये तुम्ही कधीही परिपूर्ण होऊ शकत नाही

गिल पुढे म्हणाला, “तुम्हाला माहित आहे की क्रिकेट हा एक असा खेळ आहे जिथे तुम्ही कधीही परिपूर्ण होऊ शकत नाही, परंतु नक्कीच तुम्ही त्यासाठी प्रयत्न करू शकता आणि मी तेच करण्याचा प्रयत्न करतो.”

मानसिकदृष्ट्या फ्रेश कसे राहायचे?

गिलने सांगितले की तो मानसिकदृष्ट्या कसा फ्रेश राहतो? गिल म्हणाला, “मला वाटते की तयारी हीच मला मानसिकदृष्ट्या ताजी ठेवते, मला पुढील आठवड्यात, पुढील काही आठवड्यांत किंवा पुढील मालिका किंवा पुढील स्पर्धेसाठी काय करायचे आहे हे जाणून घेणे आणि त्यासाठी तयारी करणे.”

शुभमन गिलची T20 आंतरराष्ट्रीय कारकीर्द

गिलच्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने आतापर्यंत 36 फॉर्मेटमध्ये सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 36 डावांमध्ये फलंदाजी करताना गिलने 28.03 च्या सरासरीने आणि 138.59 च्या स्ट्राईक रेटने 869 धावा केल्या आहेत. या कालावधीत, त्याने 1 शतक आणि 3 अर्धशतके केली, ज्यामध्ये उच्च धावसंख्या 126* धावा होती. आता गिलचे भारतीय टी-२० संघात पुनरागमन कधी होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *